(टीप:- हि कविता सत्य घटनेवर आधारित आहे)
व्यथा मनाची मी सांगू कुणाला ?
आपलं आता मी म्हणू कुणाला ?
कशाला हवेत कोणी सोबतीला ?
असेल जर कलंकच माणुसकीला ..!!
नात्यात ज्या जीव गुंतला
मैत्रीनेच त्याचा गळा घोटाळा
हे पंढरीच्या विठ्ठल्ला
सांग मी काय गुन्हा केला ?
माझ्याच घरात जेवला
लागला मायेचा लळा
ममतेलाच सुरुंग लागला
जेव्हा घरच त्याने उध्वस्त केला ..!!
कसा आवरू या उद्विग्न मनाला ?
नात्यांवरही आता विश्वास ना उरला
नियतीनेही आज मला
असा कसा ठोकरला ?
मित्रत्वाच्या नात्याला
कलंक असा लागला
जीव जडला ज्या नात्यावर
खंजीर पाठीत त्याने खुपसला !!
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले
कलेवर ज्याने पहिला
तन-मनाची आग झाली
अन ... मृत्यूचाही थरकाप झाला ...!!
........... वैभव आलीम (१०-१२-१०)
व्यथा मनाची मी सांगू कुणाला ?
आपलं आता मी म्हणू कुणाला ?
कशाला हवेत कोणी सोबतीला ?
असेल जर कलंकच माणुसकीला ..!!
नात्यात ज्या जीव गुंतला
मैत्रीनेच त्याचा गळा घोटाळा
हे पंढरीच्या विठ्ठल्ला
सांग मी काय गुन्हा केला ?
माझ्याच घरात जेवला
लागला मायेचा लळा
ममतेलाच सुरुंग लागला
जेव्हा घरच त्याने उध्वस्त केला ..!!
कसा आवरू या उद्विग्न मनाला ?
नात्यांवरही आता विश्वास ना उरला
नियतीनेही आज मला
असा कसा ठोकरला ?
मित्रत्वाच्या नात्याला
कलंक असा लागला
जीव जडला ज्या नात्यावर
खंजीर पाठीत त्याने खुपसला !!
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले
कलेवर ज्याने पहिला
तन-मनाची आग झाली
अन ... मृत्यूचाही थरकाप झाला ...!!
........... वैभव आलीम (१०-१२-१०)
No comments:
Post a Comment