आठवणींत तुझ्या मी
रात्र काढली जागून
विरहाने व्याकूळ मी
नसे का गं तुला जाण ?
काळे-काळे हे दाटले घन
पावसाची चातकाने जशी
वाट पहात थांबणं
चकोरालाही हवं जसं चांदणं
तुझ्या भेटीसाठी तसं
आसुसलं माझं मन
नाचती लाटा सागरावरी
पण भेटती किनारी येऊन
घायाळ करती मनाला
हे विरहाचे क्षणं
कधी येईल वसंत
भरेल निसर्ग टवटवी नं
हर्षाने मग कोकीळ गाईल
प्रफुल्लीत गाणं
........ वैभव आलीम (२०-०४-१०)
रात्र काढली जागून
विरहाने व्याकूळ मी
नसे का गं तुला जाण ?
काळे-काळे हे दाटले घन
पावसाची चातकाने जशी
वाट पहात थांबणं
चकोरालाही हवं जसं चांदणं
तुझ्या भेटीसाठी तसं
आसुसलं माझं मन
नाचती लाटा सागरावरी
पण भेटती किनारी येऊन
घायाळ करती मनाला
हे विरहाचे क्षणं
कधी येईल वसंत
भरेल निसर्ग टवटवी नं
हर्षाने मग कोकीळ गाईल
प्रफुल्लीत गाणं
........ वैभव आलीम (२०-०४-१०)
No comments:
Post a Comment