Saturday, 9 July 2011

विरहाचे क्षण


आठवणींत तुझ्या मी
रात्र काढली जागून
विरहाने व्याकूळ मी
नसे का गं तुला जाण ?

काळे-काळे हे दाटले घन
पावसाची चातकाने जशी
वाट पहात थांबणं

चकोरालाही हवं जसं चांदणं
तुझ्या भेटीसाठी तसं
आसुसलं माझं मन

नाचती लाटा सागरावरी
पण भेटती किनारी येऊन
घायाळ करती मनाला
हे विरहाचे क्षणं

कधी येईल वसंत
भरेल निसर्ग टवटवी नं
हर्षाने मग कोकीळ गाईल
प्रफुल्लीत गाणं

      ........ वैभव आलीम (२०-०४-१०)

No comments:

Post a Comment